Total Pageviews

Thursday, July 29, 2010

मला आवडलेल्या काही कविता

मला आवडलेल्या काही कविता ....... काही कवितांचे कवी माहित नसल्यामुळे कवी-अज्ञात असे लिहिले आहे ............. जर कोणाला त्यांचे कवी माहित असतील तर मला जरूर कळवा  ..........


शेवटचा निश्वास

संपला सारा खेळ् प्रेमाचा
उरले फ़क्त आठवणींचे अवशेष
दुर् गेल्या वाटा सुखाच्या
काहीच न राहीलेलं शेष

कधी केव्हा कुठे कसा
पण खुप जीवं लागला होता
त्यांच्या गंधाने माझ्या मनीचा
सारा आसमंत भारला होता

प्रेम निरपेक्ष असतं
म्हणणारी लोकं भेटली
करताना मात्र असं प्रेम
माझी अघोरी तडफ़ड झाली.

वाळवंटातल्या म्रुगजळागत
होता का सारा आभास
उडुन गेले स्वप्नील रंग आयुष्याचे
उरला हवेत शेवटचा निश्वास

कवी - अज्ञात

XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX


प्रेम नको...
खरचं यार प्रेम बिम काही नको...
बस...आता सगळं पुरे झालं..
कोणासाठी तिष्ठणं नको...
आजवर झालेलं पुरे झालं..
डोळ्यांत दाटलेलं पाणी नको..
अन आभाळात ओघळता मेघ नको
रात्र रात्र जागणं नको...
त्याच जुन्या पायवाटांवर चालणं नको..
बस...आता सगळं पुरे झालं..
आता प्रेम बिम काही नको...
उगाचच लिहीणं काहीही...निरर्थक..
उगाचचं वाचणं...तेच...पुन्हा पुन्हा..
आता ह्यातलं.. काहीच नको
बस...बस..मी अन मीच...
बाकी प्रेम बिम काहीच नको

Omkar

XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX


आला दारात माझ्या
बोलला आपटून काठी
चल तयार हो आता
मृत्यु तुझा मी ....
आलो तुझ्याच साठी

माझ्या चेहऱ्यावरचं...
समाधानाचं हसूं पाहुन
भ्रमित बिचारा मृत्यु तो
बोलला आवाज पाडून....

मला पाहून भल्याभल्यांची
अशी काही बोबडी वळते...
तू भेटलास पहिलाच असा
ज्याच्या गाली खळी पड़ते...

सांगितले मी त्याला
जीव सगळा एकवटून
आणखी किती मारशील मला
जीव गेलाय आधीच विरून ....
रोज तिच्या आठवणीत इथे मी
मरत आहे झुरून झुरून...

बस इथे उशाशी माझ्या
बनव ह्या खाटेला आता
तू माझीच मृत्युशैय्या
थकलो होतो किती मी
वाट पाहून तुझी वेड्या
सुरु कर तू काम तुझे...बघ
उरल्या घटका किती थोड्या

"जशी तुझी इच्छा" म्हणून
मृत्युने घेतले मला सामावून....
झाला एकरूप माझ्याशी...
अगदी काही क्षणासाठी...

तुझ्या विरहाचे भाले....
तुझ्या आठवणींच्या कट्यारी ..
झेलल्या त्याने ही उभारी...
लागल्या जेव्हा जिव्हारी...
आली ऐकू त्याची किंकाळी...
पुढच्याच क्षणी जखमी मृत्यु...
मला सोडून बाहेर पडला...

एक हात जखमेवर धरून..अस्पष्टसा बोलला...
"अरे कसले हे प्रेम आणि कसल्या त्या आठवणी
माझ्या क्रौर्याची परिसीमाही आज ओलांडली त्यांनी
तुझ्या रोजच्याच मरणाला...आज मी ही अनुभवलं
राम राम माझा तुला...तुझ्या दारी येण गडया.... मला नाही परवडलं "

--पंकज सोनवणे....


XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX


एक होता चिमना आणि एक होती चिमणी 
चिमना मोठा रुबाबदार आणि चिमणी अगदीच सुमार 
तरीही एकमेकांचे जिवलग यार.
 
वेळात वेळ काढून एकमेकांशी बोलायचे,
एकमेकांना चिडवायचे आणि खूप खूप हसायचे .
 
चिमणीच्या मनात एक खुलत होते गुपित, 
चिमण्या बद्दलचे प्रेम तिच्या मनाच्या कुपीत  
 
रोज रोज कारे देवाकडे प्रार्थना ,
त्याच्याही  मनात असू देत अशाच काहीशा भावना 
 
एक दिवस धीर करून तिने सगळे सांगितले
पण तिला त्याने अगदी सहज नाकारले 
  
त्याला म्हणे असे काहीच वाटत नव्हते,
त्याच्या डोळ्यात प्रेम आहे हे अगदी झूठ होते
  
का “नाही”  ह्याची बरीच कारणे सांगितली 
पण चिमणीच्या मनाला ती अजिबात  नाही पटली
 
चिमणी तशीच घरी गेली, तिकडे जाऊन खूप रडली 
काय करावे कळेना,रडू तिच्याने आवरेना 
 
चिमणीला एक उपाय सुचला , तिने चीमन्याशी अबोला धरला 
चिमण्याला मात्र ह्याचा सुधा काहीच फरक नाही पडला
 
चिमना अगदीच खुशीत होता , नवीन स्वप्ने पाहत होता
कदाचित तो थोडा जास्तच प्रक्टीकॅल होता 
 
चिमणीने  सुद्धा  आता हसत जगायचे ठरवले 
पण एकांतातले अश्रू तिला कधीच नाही आवरले   

एकतर्फी असले तरी चिमणीचे चीमन्यावर अगदी खरे प्रेम होते
पण कदाचित खरे प्रेम चिमण्याच्या नशिबी नव्हते

कवी - अज्ञात


XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX


एक दिवस असा होता की
कुणीतरी माझ्या फोनची वाट पहायचं
स्वतःच फोन करुन मनसोक्त बोलायचं
त्या गोड गप्पामध्ये रंगायचं

एक दिवस असा होता की
कुणीतरी तासनतास माझ्याशी गप्पा मारायचं
गप्पा तशा कमीच पण फ्लर्ट जास्त व्हायचं
मनमोकळेपणानं सर्व काही सांगायचं

एक दिवस असा होता की
कुणीतरी मला भेटण्यासाठी बोलवायचं
वेळेअभावी कामामुळे कधीच नाही जमायचं
फोनवर मात्र तीन तीन तास बोलायचं

एक दिवस असा होता की
कुणीतरी माझ्यासाठी झुरायचं
पण माझं यातनामय जीवन त्याला कसं सांगायचं
मग काय, विहिरीतील कासव बघायचं

आज दिवस असा आहे की
कुणीतरी विणाकारण मला टाळायचं
नसलेलं काम सबब म्हणून सांगायचं
वेळ देऊनही फोन नाही करायचं

आज दिवस असा आहे की
मी माझं नातं मनापासुन जपायचं
मिळालेल्या वागणुकितुन मन मात्र दुखायचं
पण माझं हे दु:ख कोणाला कळायचं

आज प्रश्न असा आहे की
का कुणाशी स्वार्थासाठी नातं जोडायचं
का प्रेमाचं नाव घेऊन ताळ तंत्र सोडायचं
का स्वतःचं व दुस-याचं जीवन भकास करायचं

मित्रा, आपल्याल नाही हे जमायचं
दु:खातही आपण मात्र हसायचं
कधी कधी एकांतजागी खुप खुप रडायचं
चेह-यावर चेहरा लावुन जगायचं!

कवी - अज्ञात


XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX


हवी होती फक्त दोन अक्षरं
पहिलं होत 'प्रे', दुसरं होतं 'म'
'म' म्हणजे मन माझं
'प्रे' म्हणजे प्रेरणा तुझी
धुंद अश्या मना माझ्या
लागली आस प्रेरणेची तुझ्या
वाटलं होतं एकदातरी जुळतील, हि अक्षरं
जुळनं राहिलं लांबच,बहुतेक होतील नश्वर
गेली वेळ निघुन आता, झाले अक्षरांचे शब्दांतर
दुसऱ्या अक्षराच्या माझ्या, झाले आज 'त' त रुपांतर
हवी होती फक्त दोन अक्षरं .

कवी - अज्ञात


XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX


तुझ्याशी नाही रे..
मला स्वतःशीच भांडायचं आहे..
कसं जगायचं..?
 किती सोसायचं..?
 याचं गणित स्वतःशीच मांडायचं आहे..

प्राजक्त असून दारी, फुले शेजारीच पडतात..
ज्यांचा आहे तिटकारा, असेच प्रसंग का घडतात..?
नशिबाचे उधळलेले वारु, अचानक अडतात..
स्वप्नांचे इमले वास्तवात न येताच मोडतात..
अवाजवी अपेक्षांचं आता इथंच सांडायचं आहे... ||१||

तुझ्याशी नाही रे..
 मला स्वतःशीच भांडायचं आहे..

कर्तव्याचं भान सोडून, थोडं मनमुराद जगायचं आहे..
सगळ्या जगाला विसरुन, फक्त माझ्याकरता काही मागायचं आहे..
बंधनं झुगारुन सगळी, बिनधास्त वागायचं आहे..
माझं जीवनगीत मला, माझ्याच सुरात गायचं आहे..
धुंद श्रावणलहरींमध्ये.. वारा पिऊन, बेफाम हिंडायचं आहे.. ||२ ||

तुझ्याशी नाही रे..
मला स्वतःशीच भांडायचं आहे..

सुख दुखाःचा ऊन-पाऊस, आशा निराशेचे चढ-उतार
मूक संवेदनांचे हुंकार आणि कल्पनेने छेडलेली.. हृदयीची तार..
शतरंगी भावनांचे पदर, अलवार उलगडणार आहे..
आयुष्याच्या रंगमंचावर, कलंदर बनून बागडणार आहे..
अस्तित्वाच्या क्षितिजावर यशाचं तोरण बांधायचं आहे.. ||३ ||

तुझ्याशी नाही रे..
मला स्वतःशीच भांडायचं आहे..
कसं जगायचं..?
किती सोसायचं..?
 याचं गणित स्वतःशीच मांडायचं आहे.. !

कवी - अज्ञात


XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX

एकाकी        

आज फार सुनं सुनं वाटतंय
एकटा वाटतंय मला...
असं वाटतंय कि कोणी नव्हतंच माझ्याबरोबर
फक्त माझ्यासाठीच असं
हा स्वार्थ हा लोभ ही इच्छा
काय उपयोग आहे याचा ?
जे मागते ते मिळत नाही, जे हवं ते कळत नाही
आणि जे शोधते ते गवसत नाही!
बहुतेक आज माझी लेखणीच बोलणार आहे
हे शब्दच माझे सोबती असणार आहेत
आज कागदालाही धन्य वाटत असेल की
त्यावरच माझ्या मनाची पाटी कोरी होणार आहे...
मी लिहित राहीन, लिहित राहीन
माझ्या भावना बरसात राहीन
पण त्याचा होईल का कधी उपयोग?
भावना थेट भिडण्याचा येईल का कधी योग?
आजपर्यंत कधी नशिबावर विश्वास ठेवला नाही
पण आज कुठेतरी भाग्यच फिस्कटल्यासारखा वाटतंय
मला आज फारच सुनं सुनं वाटतंय...

गेले होते भर भर चालत पुढे
पण आज पाऊल फार जपून टाकावासा वाटतंय
आपलं कोण ? उपरं कोण? फार मोठा प्रश्न पडलाय
उत्तर शोधू की सत्य? मन शोधू की माणसं   
प्रश्नोत्तरे म्हणजे देवाने भेट दिलेला खेळ !
मला तर विशीतच दमल्यासारखा वाटतंय...
मला आज फारच सुनं सुनं वाटतंय....

मी ठरवलं होतं स्वप्ननगरीत जायचा
मी ठरवलं होतं फुलपाखरू व्हायचा
पण साचलेली दलदल तेवढी दिसली नाही!
आत आत खोलवर बुडत गेले मी
श्वास कोंडला तेंव्हा किंमत कळली
हात पाय मारत वर आले मात्र जखमा तेवढ्या राहिल्या...
त्याही जाणार हळू हळू हे मला आज कळतंय
मला कशाचाच काही नाही असं वाटतंय...
आज मला फारच सुनं सुनं वाटतंय

देशील का रे मित्र माझी साथ ?
म्हणशील का रे की तू एकटी नाहीस?
कधी मारशील कारे पाठीवर एक निस्वार्थी थाप?
कधी धरशील का रे विश्वासार्थी माझा हात ?
राहूदे रे. नको घेउस  तू अपेक्षांचा ओझं
तू नेहमीच नसणारेस हे मला कळतंय
पण तुझ्याआधी मीच निघणार असं वाटतंय...
मला आज फारच सुनं सुनं वाटतंय
मला आज फारच सुनं सुनं वाटतंय... 

- @ नेहा घाटपांडे     


XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX


हल्ली अस का होत ते काही कळत नाही,
प्रशनच पडतात भरपूर पण उत्तर कही मीळत नाही.

कोणीतरी सोबत आहे अस क्षणभर वाटत,
त्या गोड सोबतीसाठी वेड मनही धावत सुटत.
तरीही मग ते दीशाहीन का होत ते काही कळत नाही,
वेड्या मनाचा सुर माझ्या कधीच कुणाशी जुळत नाही.

हल्ली अस का होत ते काही कळत नाही,
दीवस सरतो चुटकीसरशी पण रात्र काही टळत  नाही.

एक्ट जगण्यात ही अर्थ आहे अस काहीस वाटत,
पण तेवढ्यात त्याच्या सहवासतल प्रेम मनात साठत,
तरीही मग मी एकटीच का ते काही कळत नाही,
सगळ्याना मीळत हव ते मग मलाच का ते मीळत नाही.

हल्ली अस का होत ते काही कळत नाही,
प्रशनच पडतात भरपूर पण उत्तर काही मीळत नाही.

माझ मन जरा जास्तच हळव आहे अस कधी वाटत,
रागाने येणार्या शब्दानी माझ्या अवघ आभाळही सहज फाटत.
मग माझेच शब्द एवढे कठोर का ते काही कळत नाही,
म्हणूनच वेड्या मनाचा सुर माझ्या कधी कुणाशी जुळत नाही.

हल्ली अस का होत ते काही कळत नाही,
दीवस सरतो चुटकी सरशी पण रात्र काही टळत  नाही

त्याच्यावर प्रेम कराव आणी करतच रहाव वाटत,
क्षण दोन क्षणात मनी उदंड प्रेम दाटत.
पण मग तो माझा का नाही ते काही कळत नाही
सगळ्याना मीळत हव ते मग मलाच का ते मीळत नाही

हल्ली अस का होत ते काही कळत नाही,
प्रशनच पडतात भरपूर पण उत्तर काही मीळत नाही.

कवी - अज्ञात


XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX


कळले कुणाला मझ्या मनातले
ना कळले कुणाला प्रेम माझ्या ह्र्दयातले
ना कळले कुणाला दुःख माझ्या माझ्यातले
सुखच सुख दिसते आहे माझ्या जिवनातले
थंडीच्या गारव्यात रखरखत्या उन्हात
मी त्याची वाट पाहिली
त्याला बघताच मी माझी न उरली
ना कळले कुणाला मझ्या मनातले
दिवस-रात्र आठवण काढते त्याची
बोलण्यासाठी तरसते त्याच्याशी
ह्र्दय हे आवरेणा
ना कळले कुणाला मझ्या मनातले
कळी उमलली मोगरा फ़ुलला
प्रेमाचा अंकुरहि सहज फ़ुट्ला
प्रेमीकांचा संगम झाला
ना कळले कुणाला मझ्या मनातले
तुला पाहीले प्रेम समजले
प्रीतीचे फ़ुल हळूच उमलले
तुला मी माझ्या ह्र्दयात बसविले
ना कळले कुणाला मझ्या मनातले
नजरेत तुझ्या मी स्वतःला हरविले
दुःखच दुःख उरले
गेलास तु दुर माझ्यापासूनी
ना कळले कुणाला मझ्या मनातले
जीवनातले सुख सहज सरले
रडणे मन वरुनी हसताना दिसले
फ़ुलही दिसले काटेही बोचले
ना कळले कुणाला मझ्या मनातले!!!

-Radha


XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX

''कविता कशा सुचतात रे ?''
माझ्या मित्राचा नेहमीचा प्रश्न
मी त्याकडे पाहतो आणि फक्त हसतो

'' अरे फार काही अवघड नाही रे
एक कोरा कागद, एक पेन आणि अस्वस्थ मन
एका जागी जमले, सूर जुळले की
मग होऊन जाते कविता
वार्‍यावर उडणार्‍या पिसाप्रमाणे मन भरकटू लागते
अन् भरकटल्यासारख्या कविता करू लागते
आता हल्ली कविता भरकटत चालल्या आहेत खर्‍या
पण जिथे माणूसच भरकटत आहे तिथे कवितांच काय ?

कविता म्हणजे स्वातंत्र्य, कविता म्हणजे मोकळा श्वास
कुणी शिकवून येत नाहीत रे कविता
इथे शब्दांची जुळवाजुळव नको अन् भावनांचा आविष्कार ही नको
केवळ जे सुचेल ते लिहावे, मनास रुचेल ते लिहावे
कुणाच्या तरी प्रेमात ही पडावे
एकदा तिच्या प्रेमात पडलो की कवितांची वेल अशी बहरते म्हणून सांगू...
मग ध्यानी मनी केवळ प्रेमाच्याच कविता...
प्रेम असेपर्यंत सगळे ठीक असते
पण विरहात मात्र शब्दच अधिक साथ देतात
मग शब्दांच्या प्रेमापुढे ते प्रेम फिके वाटू लागते
बघता बघता आपण कवितेच्याच प्रेमात पडू लागतो

पहिल्यांदा जो फक्त छंद असतो
त्याची नंतर सवयच लागते
वेड्यासारख्या कविताच करायला लागतो
दिवसभर जिथे तिथे कविताच
रात्र-रात्र जागून काढली आहे रे
आणि अंधारात चाचपडत एका कोर्‍या कागदावर
दिसत नसतानाही कविता लिहिली आहे
काय सांगू तुला ?

हे वेडेपण अंगात भिनत जाते
आणि वेडेपणाने जगण्यात खरा शहानपणा आहे हेही कळत जाते
मग शहाण्यासारखे जगण्याचा वेडेपणा कोण करणार ?
हळूहळू व्यसनच लागते कवितांचे
मग आपल्या नेहमीच्या बोलण्यालाही लोक कविताच समजू लागतात
अर्थात आपल्याला काही फरक पडत नाही
आपण स्वछन्दपणे या आभाळात विहरतो
सुख-दु:खाच्या या फसव्या जगापासून
आपण केव्हाच मुक्त होऊन जातो
आता फक्त मी आणि माझी कविता
मी तिच्यात भिनत जातो आणि ती माझ्यात... ''

एवढे सांगून ही हे शहाणे लोक काही समजत नाही
आणि शेवटी वेड्यासारखा प्रश्न विचारून मोकळे होतात

'' मला शिकवशील का रे कविता ?''
मी त्याकडे पाहतो आणि फक्त हसतो....

-काव्य सागर

Wednesday, August 5, 2009

मराठी कविता

मेरी यादोंमे, मेरी बातोंमे,
मेरी ख्वाबोंमे भी तुम हो,
कभी जुदा ना होना हमसे,
हम मर जायेंगे क्योंकी
मेरी सांसो मे भी तुम हो.

************************

मौसम बदलता रहेगा,
कारवॉ चलता रहेगा,
दुरी ना जानता कोई,
अजनबी मिल जायेंगे,
अपने बिछड जायेंगे,
मंजिल ना जानता कोई.

****************************************************

हम हो गये है अब उदास
बन गये है हम अभी देवदास.
क्या कहे आपको भरोसा नही करते हमारे हि कोई खास
हम ने लगा रखी थी जिन पे आस.
हम झुठे तो थे हि अब उनकी नजरों मै चोर भी हो चुके है
हम ऐसे नही थे शायद हम हि यही भूल चुके है.
कभी हमे वो चोर तो कभी झूठा कहते है
क्या इतना हि विश्वास वो अब हम पे करते है.

*****************************************************

सगळ्यांचे स्वभाव असतात वेगळे वेगळे
ते ना तुला कळे, ना मला कळे
ते जेव्हा केव्हा तुला कळे
तेव्हा करावे लागेल तुला काही तरी वेगळे.

- राजा

Wednesday, November 26, 2008

चांदण (नातं म्हणजे काय ?) - सचिन काकडे

ये... छोटु एक कटींग दे रे.. !!

का? रे.... तुष्या आज ऑफ़िसावरुन लवकर....
आणि इथे कट्ट्यावर आम्हाल कसं काय दर्शन दिलत..
शि-याने कट्ट्यावर बसत विचारलं...

नाही रे हाल्फ़ डे घेतला मुड नव्हता आज....
का रे काय झालं?
कुछ नहीं यार...वही रोज रोज की टॆन्शन्स मग दुसरा जॉब शोध ना....

अरे काय सल्ला देतोयस?????......
प्रत्येक कंपनी सध्या टेक्नीकल नॉलेज ला महत्व देतेय...
आम्ही काय बी. कॉम ग्रज्युएट...अकांउंट्स च्या वर्तुळाबाहेर जग नाही रे आम्हाला...
तुझी लाईफ़ खरच सही आहे यार..एकदम हींदी पिक्चरमधल्या हिरोसारखं जगणं आहे...
आमच्या नशिबाच्या रेषा आम्ही हाताने कोरतोय तुझ्या तर आधीच कोरलेल्या आहेत त्याही देखण्या नक्षीत...
कॉलेजमध्ये आमच्यासोबत फ़क्त एक ऎश म्हणुन होतास
आता आराम करतोयस उद्या वडिलांचा बिझनेस सांभाळशील...एखाद्या दिवशी तुझे वडिल तुला ऑफ़ीसला नेउन म्हणतील...."श्रीरंग बेटा आजसे तुम यहा इस खुर्सी पर बैठोगे आजसे ये कंपनी तुम्हारी...!!

गप रे साल्या त्यातही केवढी लफ़डी आहेत तुला नाही कळणार...अरे ज्याला त्याला आपलं ते कार्ट आणी दुस-याच ते सोनुलचं वाटतं ...ज्याची जळते ना त्यालाच कळते...

मागुन दिन्या गाडीचा हॉर्न वाजवत हात दाखवुन पुढे गेला....

साल्याला दोन मिनिटं थांबता येत नाही का? शि-या वैतागला.
अरे कामात असेल यार.. साहेबांच लग्न आलय चार दिवसांवर घाईत असेल...
हा..आणि कामं करणार पक्का कामचोर आहे दिन्या...मागच्याच महिन्यात त्याच्या तातश्रींनी त्याला गाडी रिपेअर करुन आणायला सांगितलेली तर याने त्यांना "नाही करत" म्हणत उलट उत्तर दिलेलं...आठवतं का?

शि-या तु पण ना...यार शिंदेसरांसारखा आहेस...वेळेवर तुला अश्यागोष्टी बरोबर आठवतात त्यांच्या सारखाच हातात लाल कलरचा पेन घेऊन फ़िरतोस दिसली चुक की मारला शेरा...सोड ना तुला काय घेणं देणं ...बिघडला आता
तो...चांगल्याच्यात गेला...आपण कायं जैसे थे...उद्या तुझंही लग्न होणारच..
आणी साल्या तुझंही.....शि-याने मध्येच वाक्य तोडलं.....

हं माझं...... माझं कसलं रे??
का रे काय झालं...
काही नाही यार सोडं...
तुष्या सांग का?? ते...
सांगतो...! आधी तु सांग तुझी नात्याची व्याख्या काय?
का रे आज डायरेक्ट हा प्रश्न का?
काही नाही रे सहजच विचारतोय....
शि-या.....नातं म्हणजे काय ? मी त्याच्या डोळ्यात पाहत विचारलं....

हं..नातं... तुष्या नातं म्हणजे चांदण..
जसा रात्री पडणा-या चांदण्यात एकटा चंद्र दिसतो ना तस काही आपण असतो
इतके जवळ असुनही भरवसाचं कुठलच चांदण नसतं त्याच्यासाठी...
आणि हे चांदण म्हणजे तु करत असलेल्या प्रवासात तुला क्षणभराची..काही काळापुरती सोबत..
मग ते कुठलही असो आइ-बाप,भाऊ-बहीण, मित्र-मैत्रीणी, प्रेयसी-बायको, मुलं-बाळं, आणि बरेच काही..
एका ठराविक वेळेपुरते ही आपल्याला या प्रवासात कंपनी देतात, आपल्या सोबत हसतात, रडतात, जगतात,
त्यांनाही आपला प्रवास असतो रे..आपण फ़क्त ती
सोबत एंजॉय करायची...सुख: दुख: वाटुन घ्यायचे..
जशी तुलाही त्यांची गरज असते तशी त्यांनाही तुझ्या सोबतीची गरज असते..
त्यात गुंतण, न गुंतण हे सर्वस्वी तुझ्या हातात असतं,
तुझ्या म्हणण्यापेक्षा तुझ्या मनाच्या हातात...!! मी बघ तसच करतो...
अरे आज आहे उद्या नाही, कशाचाही भरवसा नसतो हे शापित सत्य आहे मित्रा..
आपलं इथ काही नसतं ना कुठली वस्तु, ना पैसा, ना कूठली माणसं...
मग कशाला उगाच या गोष्टींच ओझं घेउण फ़िरायचा हे माझं ते माझं, हा माझा तो माझा,
हे काहीच नसतं तुष्या..इथं फ़क्त आपण असतो आपण..आपणच आपल्यासाठी जगायचं असतं...
मी तर म्हणतो अश्या गोष्टीत गुंतण्यापेक्षा समोरचा प्रत्येक क्षण, दिवस मजेत घालवायचा....
आणि हसत शेवटापर्यंतचा प्रवास करायचा...सोबतच्या असलेल्या चांदण्याबरोबर....
याच प्रवासाला जगणं आणि त्या चांदण्याला नातं म्हणतात...

म्हणजे कमीत कमी मी तरी म्हणतो ऑर मानतो....
एका दमात हे सगळं सांगुन शि-याने खिशातले सिगारेचं पाकीट काढलं...
माझ्या समोर केलं मी हातानेच नको केलं...
आज खरंच मुड नाही रे...
"अच्छा.. !! आता तु सांग काय प्रॉब्लेम झाला...?
काही नाही यार...श्रेयाचा फ़ोन आलेला मघाशी...!!
मग...?
काही नाही लग्न ठरलं तिचं...
कधी..? कुणाशी..?
आजच तिने लगेच मला कॉल केला...आणि सांगितलं
पुण्यातला मुलगा आहे सॉफ़्टवेयर इंजिनियर...एम.एन.सी मध्ये जॉबला आहे...
चांगलं पॅकेज मिळतं घरच्यांनी आज पहायचा पोग्राम ठेवलेला...पुढच्या महीन्याची तारीख काढलीये...
लग्नानंतर लगेच ऍब्राड्ला जाणार आहेत...
अरे पण तुझ्यासाठी थांबणार होती ना ती?
शि-याने वैतागत विचारले..त्याचा आवाज जरा मोठा झालेला..
टपरीवरच्या भैयाने हातातले पान खाली ठेवता ठेवता आमच्या दोघांकडे पाहीलं...
समोरुन शि-याच्या घरची गाडी येत होती आत त्याचे वडील होते...
"शि-या तुझे डॉन....!!
मी शि-याला सावध केलं..शि-याने हातातली सिगारेट पटकन फ़ेकली....
"श्रीरंग....चल रे.....!! शि-याच्या वडीलांनी त्याला हाक मारली....
चल तुझ्या....रात्री येतो कट्ट्यावर मिस कॉल टाक नंतर..
शि-याने पाठीवर थाप मारली आणि उडी टाकुन गेला....

प्रेम म्हणजे काय? नाती म्हणजे काय ?
काही प्रश्नाची आपल्याला जाणीव असते.
त्यांची उत्तरदेखील काही प्रमाणात माहीत असतात पण पण या प्रश्नांची जाणीव
आणि उत्तर देखील माहीत असुन उपयोग होत नाही..

त्यांच अस्तित्व जास्तच गुढ आणि गर्विष्ठ असतं श्रेयाचे शब्द अजुन कानात घुमत होते.
"व्हायचं तेच झालं तरी तुला मी सांगत होते....
तुझं म्हणणं मला पटतयं रे..पण मी घरच्यांना नाही रे पटवुन देऊ शकत.."
एरव्ही शब्दांशी खेळणारा मी, पण आज तेच शब्द काळजात पार घुसत गेले.
माझ्यासारखेच असे कित्येकजण असतील ज्यांच्या स्वप्नांचा दुनियेच्या या व्यवहारीक पणामुळे निखारा झाला असेल..
आणि आज त्यात आणखी एक निखारा...आग भडकतच चाललीये साला...
प्रेम..प्रेम खेळ आहे सगळा दोन मनं काही कारण नसताना..नसताना की असताना शिट..
आज माझंच काही खरं दिसत नाही का या गुंत्यात अडकलो.

आजवर इतकं लिहिलं, वाचल, पाहील, अनुभवलं..कशाचाही काही उपयोग नाही...
आजही विचार करुन असा काय मोठा तीर मारणार..
जाउ दे, उलट या विचांराच्या गोंधळात पडलं की जिवघेणा त्रास सुरु होतो...
काही प्रश्न-उत्तरांना आकार नसतो.. हेच खरं पहीलं अश्यावेळी काहीतरी लिहुन काढावसं वाटायचं,
पण आता शि-याचे शब्द आठवतात..."शब्दात जगणं सोड मित्रा, व्यवहारीक हो!"
दुनियादारिला किंमत नसते, जोतो स्वार्थासाठी जगतो.."
तेव्हा या मुद्द्यावर भांडायचो पण आता त्याचच पटतयं.
आपलीच माणसं आपल्याला हे सांगत असतात, पावलोपावली जाणीव करुन देतात..

आपलीच माणसं पैश्यासांठी, स्वार्थासाठी अशि परकी व्हावीत,
आणि आपण त्यांच्यासाठी सारं काहि विसरुन झटत राहायचं.. का ?कशासाठी?
आता अवस्था अर्जुनासारखी झालीये...
तोही तिथं कुरुक्षेत्रावर आपल्या माणसांच्या विरोधात लढायला तयार नव्हता..
आणि इथं मी आपल्या माणसांशी व्यवाहारिकपणात नाही राहु शकत....
त्यांना सोडु नाही शकत...आता काय? मी सोडण्याचा प्रश्न येतोच कुठे?

"चांदण्यांनी भरलेल्या आभाळाला नजर लागावी आणि
त्याला हवा असलेला त्याच्या जवळचा एक-एक तारा त्याच्या नकळत असा निखळून खाली पडावा....
आणि त्यांनी फ़क्त ओल्या डोळ्यांनी ते पहात रहावं...
निखळलेला तो प्रत्येक तारा कुठल्याश्या सरोवरात पडल्यानंतर शात होऊन
आपल्या नव्या अस्तित्वात स्वछ्चंदी जगणं जगत राहीलेला चंद्रानं पाहयचं अन,
त्यातच आपलं सुख मानायचं असतं." हा नियतीचा नियम आहे...नियतीचा नियम..
त्याच्यापुढे माझ्यासारख्यांच काय ???

शि-या बोलत होता त्यात तथ्य होतं माणुस किती वेळ कुणासाठी थांबु शकतो कुणाबरोबर राहु शकतो...?
पाच मिनिटं, पाच दिवस, पाच महीने, पाच वर्ष.....
त्यानाही त्याची दुखणी असतातच की त्यानाही त्यांच जग असतच...
आपनही त्यांच्यासारखेच...व्यवहार हा जगण्यातलाच एक भाग मग भले त्यात स्वार्थ असु दे....
खिशात मोबाईल वाजला...कूणीतरी मिस कॉल दिला...
उगाच हसलो...कुणाचा असेल....मिस कॉल देणारी तर गेली...आता कोण...????????
लॉक खोलले..घरचा होता....
बॅग घेउन......गाडीला कीक मारली....
अन, घराची वाट धरली.....

- सचिन काकडे

Sunday, April 6, 2008

स्त्री / Woman
























महाश्वेता - डॉ. सूमती ्षेञमाडे











बाप्लेकी - न्कुशा : काल, आज व उद्या (Vidya Vindhawas)
















बायको


नवरा